शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक घोटाळेबहाद्दरांना आर्थिक दंड आवश्यक : वाय. व्ही. रेड्डी -शिवाजी विद्यापीठात बँकआॅफ इंडिया अध्यासनातर्फे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:04 IST

बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले

कोल्हापूर : बॅँकांमध्ये घोटाळे करणाऱ्यांना केवळ शिक्षा पुरेशी नसून, त्याबरोबरच त्यांना आर्थिक दंड करणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते.

राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षपदी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. यावेळी व्यासपीठावर रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. रेड्डी यांनी ‘बॅँकांची सुरक्षितता’ या विषयावर आपले विचार मांडले.

डॉ. रेड्डी म्हणाले, बॅँकामध्ये ठेवी ठेवताना नागरिक सर्व बाजूंनी विचार करतात. १०० टक्के ठेवी सुरक्षित आहेत, असे म्हणता येत नसले तरी त्या नाहीत असेही म्हणता येत नाही. २००१ साली अनुत्पादित कर्जाचे प्रमाण आतापेक्षा खूपच जास्त होते. मात्र नंतर त्यामध्ये सुधारणा होत गेल्या.

जगभरामध्ये २००८ मध्ये आर्थिक संकटामध्ये अनेक बॅँका अडचणीत आल्या तेव्हासुद्धा भारतातील बॅँका टिकून राहिल्या, याची आठवण करून देत डॉ. रेड्डी यांनी यासाठीची आपली आधीपासूनच तयारी होती असे नमूद केले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्या हस्ते यावेळी डॉ. रेड्डी आणि बॅँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यासन प्रमुख डॉ. व्ही. बी. ककडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात, व्ही. बी. पाटील, अभय गांधी, बाळ पाटणकर, रवी शिराळकर, किरण कर्नाड, आदी मान्यवर उपस्थित होते.एसपीपी थोरात यांना अभिवादन !व्याख्यानाच्या सुरुवातीलाच डॉ. रेड्डी यांनी ले. जनरल एसपीपी थोरात यांना अभिवादन केले. चीनबाबत या कोल्हापूरच्या सुपुत्राने दिलेला सल्ला मानला नाही आणि त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली, असे ते म्हणाले.कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील बॅँक आॅफ इंडिया अध्यासनातर्फे शनिवारी रिझर्व्ह बॅँकेचे माजी गव्हर्नर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी रिझर्व्ह बॅँकेच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे उपस्थित होते.

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडियाkolhapurकोल्हापूर